दुःखाची संगति – सार्थ तुकाराम गाथा 1489

दुःखाची संगति – सार्थ तुकाराम गाथा 1489

दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति ॥१॥
अवघें असो हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥
क्षणभंगुर ते ठाव । करूनि सांडावेचि वाव ॥२॥
तुका म्हणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥३॥

अर्थ

ज्याच्या संगतीने दुःख होते अशा विषयांच्या ठिकाणी कोण प्रेम करणार? आता सर्व संसार बाजूला ठेवू आणि सावळ्या हरीशी संबंध जोडू. सर्व विषय क्षणभंगुर आहेत याविषयी विचार करून त्याचा त्याग करावा. तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले मी हरीच्या रूपाशी संबंध जोडले त्यामुळे मला उत्तम स्थान प्राप्त झाले.