बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त – संत तुकाराम महाराज अभंग – 1751

बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त – संत तुकाराम महाराज अभंग – 1751

बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥१॥
येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥
राम कृष्ण हरी मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥२॥
तुका म्हणे ऐसें देईन मी दिव्य । जरी होईल भाव एकविध ॥३॥

अर्थ

अरे तुम्ही एकांतात बसुन प्रथम चित्त शुद्ध करा आणि ज्या वेळेस तुमचे चित्त शुद्ध होईल मग त्या सुखाला अंतपार नाही. एकदा की तुमचे अंतकरण शुद्ध झाले मग तो गोपाळ तुमच्या अंतकरणात येऊन राहिल आणि कष्टाने जे फळ प्राप्त होणार आहे ते फळ तुम्हाला बसल्या जागीच प्राप्त होईल. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी या मंत्राचा चा उच्चार तु वेळोवेळी करत राहा. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या मनामध्ये हरी विषयी एकनिष्ठ भक्ती भाव जर होईल तर मग मी तुला दिव्य प्रकारच्या अनुभवाचा साक्षात्कार घडुन देईल.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.