पैल घरीं जाली चोरी – संत तुकाराम महाराज अभंग – 1725

पैल घरीं जाली चोरी – संत तुकाराम महाराज अभंग – 1725

पैल घरीं जाली चोरी । देह करीं बोंब ॥१॥
हाबा हाबा करिसी काय । फिराऊनि नेटयां वाय ॥ध्रु.॥
सांडुनियां शुद्धी । निजलासी गेली बुद्धी ॥२॥
चोरीं तुझा काढिला बुर । वेगळा भावा घातलें दूर ॥३॥
भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥४॥
तुका म्हणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥५॥

अर्थ

देहाच्या पलीकडे असलेल्या आत्मवस्तूची चोरी झाली व त्यामुळे अज्ञान निर्माण होऊन जीव “मी व माझे” असे बोंब मारीत आहे. अरे तू पुन्हा फिरुन या भवसागरातील गोष्टींसाठी हाव का करतो आहेस ? ज्ञान विसरुन गेलास त्यामुळे तुझी शुध्द हरपली आणि त्या कारणानेच तुझी आत्मभूती नष्ट झाली आहे. तुझी आत्मवस्तू चोरीला त्यामुळे तुझे ऊर दडपून गेले आहे खरे तर तुला आत्मभावापासून वेगळे करुन प्रकृतीभावात दूर नेऊन टाकले आहे. अरे तू भलत्याच गोष्टींना वाव देत बसलास त्यामुळे तुला अशी स्थिती प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मागे जे झाले ते झाले आता तुझ्याकडे जे आत्मप्राप्तीचे साधने उरले आहेत तेवढे तू जतन कर.”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.