केलें नाहीं मनीं तया घडे त्याग – संत तुकाराम महाराज अभंग – 1711

केलें नाहीं मनीं तया घडे त्याग – संत तुकाराम महाराज अभंग – 1711

केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥१॥
देवचि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग ॥ध्रु.॥
त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥२॥
तुका म्हणे आपआपणा विचारा । कोण हा दुसरा सांगे तुम्हां ॥३॥

अर्थ

जो म्हणतो की मी काहीच केले नाही आणि सर्वस्वाचा त्याग ही जो करतो. व त्याच्या चित्तामध्ये प्रपंच याविषयी दुख नसते त्याचाच खरा त्याग घडतो. अंतःकरणातील त्यागाची वृत्ती केवळ देवच जाणत असतो आणि बाह्य रंगाने त्याग करण्याचे दाखविणे हे व्यर्थ आहे. एखाद्या विषया विषयी त्याग केला व त्याचे ध्यान तसेच अंतकरणात असेल तर तो त्याग होत नाही ती केवळ त्यागाची विटंबना आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याग करण्याविषयी तुम्ही स्वतःच स्वतःला विचारून पहा दुसरे कोण तुम्हाला सांगेन?


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.