संध्या करितोसी केशवाच्या नांवें – संत तुकाराम अभंग – 1672

संध्या करितोसी केशवाच्या नांवें – संत तुकाराम अभंग – 1672

संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥१॥
किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥
माजल्या न कळे उचित तें काय । न द्यावें तें खाय द्यावें सांडी ॥२॥
तुका म्हणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥३॥

अर्थ

अरे तू संध्या केशवाच्या नामाने करतो परंतु सर्व गोष्टींचा आरंभ तो केशव आहे त्याचे तुला काहीच ज्ञान नाही, अशा मूर्खांना किती सांगावे किती यांची फजिती तरी किती करावी कारण यांच्या जवळ त्यांचे हित आहे तरीदेखील त्यांना कळत नाही. सत्तेच्या जिवावर असे मूर्ख लोक माजल्यासारखे करतात त्यांना जे खाऊ नको सांगितले तर ते लोक तेच खाणार आणि आपण जे खायला देऊ त्याचा ते स्वीकार करत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात असे अनेक मूर्ख लोक आहेत की ते अंधारामध्ये घराचा दरवाजा समजून भिंतीला डोके आदळत असतात.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडि ओस्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.