हरीचे नाम कदाकाळी कां रे नये वाचे – संत तुकाराम अभंग – 1643

हरीचे नाम कदाकाळी कां रे नये वाचे – संत तुकाराम अभंग – 1643

हरीचे नाम कदाकाळी कां रे नये वाचे । म्हणतां रामराम तुझ्या बाचे काय वेंचे ॥१॥
पोटासाठी खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणतां तुझी बसली दात खीळ ॥ध्रु.॥
द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती ॥२॥
तुका म्हणे ऐशा जीवा काय करूं आता । राम राम न म्हणे त्याचा गाढव मातापिता ॥३॥

अर्थ

अरे हरीचे नाम कधीकाळी तुझ्या वाचे मध्ये का बरे तुला घेता येत नाही वाचेने राम राम म्हटले तर तुझ्या बापाचे काही खर्च होणार आहे काय? अरे तू पोटा करता रात्रंदिवस खटपट करतो आणि राम राम जर तुला म्हणायला लावले तर तुझी दातखिळी बसते. द्रव्य मिळण्याच्या आशेने तुला दहाही दिशा काम करण्यासाठी पुरत नाहीत पण किर्तनाला जाण्या करतात तुझ्या कायची म्हणजे शरीराची माती फार जड होते काय? तुकाराम महाराज म्हणतात या अशा जीवांना मी काय करू, जो मुखाने राम राम असे म्हणत नाही तो व त्याचे आई-वडील गाढवच आहेत म्हणजे तो गाढवाच्या पोटी जन्माला आला आहे असे समजावे.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.