पवित्र तें अन्न – संत तुकाराम अभंग – 1605

पवित्र तें अन्न – संत तुकाराम अभंग – 1605

पवित्र तें अन्न । हरीचिंतनीं भोजन ॥१॥
येर वेठया पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥
जेऊनि तो धाला । हरीचिंतनीं केला काला ॥२॥
तुका म्हणे चवी आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें॥३॥

अर्थ

हरिचिंतन चालू असताना जे अन्नसेवन केले जाते ते अन्न पवित्र आहे. हरिचिंतन केल्याशिवाय अन्न भक्षण करणे म्हणजे ते चामड्याच्या पिशवीत काहीतरी भरावे असेच होते. हरिचिंतन करता करता अन्नाचा काला करूनच जो जेवण करतो तो खरा तृप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात भोजन करताना विठ्ठल नाम घेतले तर त्या अन्नाला मोठी गोडी येते.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.