नको नको मना गुंतूं मायाजाळीं – संत तुकाराम अभंग – 1597

नको नको मना गुंतूं मायाजाळीं – संत तुकाराम अभंग – 1597

नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥
सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥२॥
तुका म्हणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥३॥

अर्थ

हे मना तू प्रपंचाच्या मोहजाळात मायाजाळामध्ये गुंतू नकोस तुला गिळून टाकण्याकरता काळ जवळ आला आहे. ज्यावेळी तुझ्यावर काळाची झडप पडेल तेव्हा तुला त्याच्यातून तुझे मायबाप देखील सोडवणार नाहीत. त्यावेळी तुला देशाचा राजा चौधरी आणि इतरही तुझे मोठे मोठे नातेवाईकही सोडविणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “एका चक्रपाणीवाचून तुला त्यावेळी कोणीही सोडविणार नाहीत.”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.