नये पाहों मुख मात्रागमन्याचें – संत तुकाराम अभंग – 992

नये पाहों मुख मात्रागमन्याचें – संत तुकाराम अभंग – 992


नये पाहों मुख मात्रागमन्याचें । तैसें अभक्ताचें गुरुपुत्रा ॥१॥
म्हणऊनि बरें धरितां एकांत । तेणें नव्हे घात भजनासी ॥ध्रु.॥
नये होऊं कदा निंदकाची भेटी । जया द्वैत पोटीं चांडाळाच्या ॥२॥
तुका म्हणे नका बोलों त्यासी गोष्टी । जयाचिये दृष्टी पाप वाढे ॥३॥

अर्थ
जो नालायक प्रत्येक्ष मात्रा गमान्य म्हणजे आईशी संबंध ठेवणारा असतो त्याच्याशी संबंध ठेऊ नये तसेच गुरूची निंदा करणाऱ्या शिष्याचे हरी भक्ताची निंदा करणाऱ्याचे तोंड पाहू नये.म्हणून एकांत धरणे केंव्हाही चांगले त्यामुळे आपल्याला भजनास व्यत्येय येत नाही.कधीही निंदकाची भेट होऊ नये कारण त्या चांडाळाच्या पोटी कपट असते.तुकाराम महाराज म्हणतात ज्याला पाहिल्यावर पाप वाढते अश्या माणसाशी कधी बोलू नये.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

नये पाहों मुख मात्रागमन्याचें – संत तुकाराम अभंग – 992

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.