माझे मनोरथ पावले – संत तुकाराम अभंग – 972

माझे मनोरथ पावले – संत तुकाराम अभंग – 972


माझे मनोरथ पावले जैं सिद्धी । तई पायीं बुद्धी स्थिरावली ॥१॥
समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरण हें ॥ध्रु.॥
त्रिविध तापाचें जालेंसे दहन । सुखावलें मन प्रेमसुखें ॥२॥
महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगीं संग अखंडित ॥३॥
जीवनाचा जाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरीं मावळलें ॥४॥
तुका म्हणे माप भरु आलें सिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥५॥

अर्थ
माझे मनोरथ तेंव्हाच सिद्धीला जाईल जेंव्हा माझी बुद्धी हरी चरणी स्थिर होईल.या हरीच्या स्मरणाने माझा जीव समाधान पावला असून निश्चल झाला असून माझी सर्व हळहळ संपली.हरीच्या प्रेम सुखाने माझे मन सुखावले असून त्रिविध तापाचे दहन झाले आहे.पांडुरंग रुपी महालाभ मला झाला व नामरूपाने तो माझ्या जिभेवर वसला व सर्वांगामध्ये तोच अखंडित पणे व्यापून राहिला आहे.माझ्या जीवनाच्या अंतरंगात ओलावा निर्माण होऊन या विश्वाचा विश्वंभर माझ्या अंतरंगात राहिला आहे.तुकाराम महाराज म्हणतात ज्या प्रमाणे माप भरल्यावर जसे सिग लागते जसे गंगेला अनेक प्रवाह मिळून पूर येतो त्याप्रमाणे माझ्या हरी प्रेमाला पूर आला आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

माझे मनोरथ पावले – संत तुकाराम अभंग – 972

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.