चिंतनासी न लगे वेळ – संत तुकाराम अभंग – 952

चिंतनासी न लगे वेळ – संत तुकाराम अभंग – 952


चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावें ॥१॥
सदा वाचे नारायण । तें वदन मंगळ ॥ध्रु.॥
पढिये सर्वोत्तमा भाव । येर वाव पसारा ॥२॥
ऐसें उपदेशी तुका । अवघ्या लोकां सकळां ॥३॥

अर्थ
आहो चिंतन करण्यासाठी काहीवेळ काळ लागत नाही ते केव्हाही सर्व काळ करावे.ज्याच्या वाचेतनेहमी नारायणाचे नाम आहे ते वदन हे मंगल स्थान आहे असे समजावे.त्याच्या ठिकाणी हरीचा सर्वोत्तम भाव आहे इतर पसारा हा व्यर्थ आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व लोकांना नाम उपदेश करीत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

चिंतनासी न लगे वेळ – संत तुकाराम अभंग – 952

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.