नामाचें चिंतन प्रगट – संत तुकाराम अभंग – 941

नामाचें चिंतन प्रगट – संत तुकाराम अभंग – 941


नामाचें चिंतन प्रगट पसारा । असाल तें करा जेथें तेथें ॥१॥
सोडवील माझा स्वामी निश्चयेसीं । प्रतिज्ञा हे दासीं केली आह्मीं ॥ध्रु.॥
गुण दोष नाहीं पाहात कीर्तनीं । प्रेमें चक्रपाणी वश्य होय ॥२॥
तुका म्हणे कडु वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥३॥

अर्थ
तुम्ही जेथे असाल तेथे नामचिंतनाचा उघड उघड प्रसार करा.मग तुम्हांला बंधनातून माझा स्वामी म्हणजे हा परमात्मा निश्चित सोडवील हे आम्ही त्याचे दास प्रतिज्ञा करून सांगतो.कोणीही कीर्तन म्हणजे हरी चिंतन करणारा असो तो कुठल्याही प्रकरचे गुण व दोष पाहत नाही त्याला प्रेमाने आळविले म्हणजे तो आपला अंकित होतो.तुकाराम महाराज म्हणतात या हरी कीर्तना मध्ये इतके प्रेम आहे कि हा प्रपंच कडू वाटू लागतो व कीर्तन ऐकल्यावर अंगावर रोमांच उठतात त्यामुळे अष्टसात्विक भाव निर्माण होऊन कंठ दाटून येतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

नामाचें चिंतन प्रगट – संत तुकाराम अभंग – 941

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.