संतां आवडे तो काळाचा – संत तुकाराम अभंग – 900

संतां आवडे तो काळाचा – संत तुकाराम अभंग – 900


संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥१॥
परिसत्ता तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥
केले अन्याय ते सांडवी उपचारें । न देखें दुसरें नाशा मूळ ॥२॥
तुका म्हणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाहीं दया तये ठायीं ॥३॥

अर्थ

जो संतांना आवडतो तो काळाचाही काळ असतो राजा ज्या प्रमाणे समर्थ असतो त्याप्रमाणे त्याचे बाळ हि समर्थ असते त्या बालकावर राजाचीच सता असते व त्या बालकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या साठी राजा कायम प्रयत्न करत असतो.जर त्या बालकाने काही अन्याय केले तर राजा त्या बालकाला समजून सांगतो व पुन्हा असा कुठल्याहि प्रकारचा अन्याय त्याच्या हातून होणार नाही याची काळजी तो घेत असतो त्याचा कुठल्याही प्रकारच घात होणार नाही असे राजा करत नाहि.तुकाराम महाराज म्हणतात कल्पतरूची छाया अत्यंत शीतल असते त्या प्रमाणे संतही निर्मळ व दया वंत असतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संतां आवडे तो काळाचा – संत तुकाराम अभंग – 900

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.