कर्म धर्म नव्हती सांग – संत तुकाराम अभंग – 889

कर्म धर्म नव्हती सांग – संत तुकाराम अभंग – 889


कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन ॥१॥
भलत्या काळें नामावळी । सुलभ भोळी भाविकां ॥ध्रु.॥
प्रायिश्चत्तें पडती पायां । गाती तयां वैष्णवां ॥२॥
तुका म्हणे नुपजे दोष । करा घोष आनंदे ॥३॥

अर्थ

वेदोक्त कर्म जर निट आपल्या हातून झाले नाही काही उणीव राहिल्यास कर्ता पतित होत असतो.परंतु जर आपण हरी नाम केंव्हाही घेतले कधीही घेतले व कसे हि घेतले तरी त्याचा दोष लागत नाही.कायम स्वरूपी हरीनाम घेणाऱ्याच्या प्रायश्चीत्ये सुद्धा पाया पडतात.तुकाराम महाराज म्हणतात हरीनाम घोष करताना आनंदाने करावे तेथे कुठल्याही प्रकारचा दोष उत्पन्न होणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

कर्म धर्म नव्हती सांग – संत तुकाराम अभंग – 889

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.