जळतें संचित – संत तुकाराम अभंग – 852

जळतें संचित – संत तुकाराम अभंग – 852


जळतें संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥१॥
माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळां मनीं ध्याय ॥ध्रु.॥
नेदी कर्म घडों । कोडे आडराणें पडों ॥२॥
तुका म्हणे मळ । राहों नेदी ताप जाळ ॥३॥

अर्थ

धर्म नीती मध्ये असे सांगितले आहे कि देवाच्या चिंतनाने सर्व संचित कर्म जाळून जाते.म्हणून माझ्या विठोबाचे चरणकमल नित्य स्मरावे.असे केले तर त्यामुळे तुमच्या हातून कोणतेही पाप कर्म होणार नाही.कोणत्याही प्रकारे तुम्ही कुमार्गाला जाणार नाहीत.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या अंतःकरणात कुठल्याही अविद्येचा मळ राहणार नाहीत,कुठल्याही प्रकारचे त्रिविध ताप राहणार नाहीत,फक्त तुम्ही माझ्या विठोबाचे चरण कमल स्मरण करत जा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जळतें संचित – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.