नव्हे गुरुदास्य संसारियां – संत तुकाराम अभंग – 825

नव्हे गुरुदास्य संसारियां – संत तुकाराम अभंग – 825


नव्हे गुरुदास्य संसारियां । वैराग्य तरी भेणें कांपे विषयां । तैसें नाम नव्हे पंढरीराया । जया सायास न लगती ॥१॥
म्हणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंड धुवावें । अर्थचाड जीवें । न लगे भ्यावें संसारा ॥ध्रु.॥
कर्मा तंव न पुरे संसारिक । धर्म तंव फळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दुःख भवाचें ॥२॥
न लगे सांडणें मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघें तुका म्हणे। विठ्ठलनामें आटलें ॥३॥

अर्थ

गुरुदास्य कारणे हे संसारीकांना करणे फार कठीण आहे,कारण अंगी वैराग्य येत नाही आणि आले तरी संसारात तो पडत नाही.विषयांना पाहू थरथर कापतो.पण या पंढरीरायाचे नाम तसे नाही येथे कसलेही प्रकारचे कष्ट लागत नाही.हे विठ्ठल परमात्म्याचे नाम सर्व भावे गोड आहे.त्या साठी तुम्हाला अंघोळ करणे किंवा तोंड धुणे या कशाची गरज लागत नाही.ते नाम आपण केंव्हाही घेऊ शकतो.याला कुठल्याही प्रकारची चाड लागत नाही संसारिक लोकही हे नाम घेण्यास भीत नाही.संसारिक लोकांनी कितीही कर्म केले तरी ते पूर्ण होतच नाही.पण धर्म हे फळदायक आहे आणि धर्म म्हणजे विठ्ठलाचे नामस्मरण आहे,त्याने संपूर्ण भाव दुखाच नाश होतो.तुकाराम महाराज म्हणतात येथे कसलीही खटाटोप करण्याची आटाआटी करण्याची गरज नाही.विठ्ठल हे आगम निगमचे स्थान आहे कि ज्या नामा मध्ये सर्व रस अतीव झाले आहे त्या नामात सर्व काही सामावलेले आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

नव्हे गुरुदास्य संसारियां – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.