सेत आलें सुगी सांभाळावे – संत तुकाराम अभंग – 815

सेत आलें सुगी सांभाळावे – संत तुकाराम अभंग – 815


सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिक आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥
सोंकरीं सोंकरीं सोहंकरी । विसावा तों वरी नको उभें आहे तों ॥ध्रु.॥
गोफणेसी गुंडा घालीं पागोऱ्याच्या नेटें । पळती आहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥२॥
पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मानी बळ बुद्धी व्हावीं दोनी ॥३॥
खळे दातें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्यांचे भाग देई त्यासी ॥४॥
तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥५॥

अर्थ

आपले देह हे शेत आहे हे सुगीला आले असून त्याचे जे चार कोपरे आहेत ते म्हणजे इंद्रिय,प्राण,मन,बुद्धी हे सांभाळावे. पिक आले आहे तरी ते चांगल्या प्रकारे जतन केले पाहिजे.त्याला तू चांगल्या प्रकारे सांभाळ, तू चांगल्या प्रकारे सांभाळ, तू चांगल्या प्रकारे सांभाळ.गोफण म्हणजे मुखात तू हरी नामचे गोफण गुंडा घालून तू फेक जेणे करू तुझ्या या शेतातील म्हणजे शरीरातील काम क्रोध रुपी पाखरे उडून जातील.तू तुझ्यातील आगटी पेटवून जागा सोडून दुसरीकडे म्हणजे देहबुद्धीची जागा सोडू दुसरीकडे राहा,तू तुझ्यातील अभिमानाचा हल्ला परतवण्यासाठी बळ व बुद्धी यांचे सहाय्य घ्यावे.या पिकाच्या खळ्यावर तू सर्वांना उपदेश रुप दान देऊन सुखी कर.तू तुझा सारा भरून ज्याचा त्याचा भाग त्याला देऊन टाक.तुकाराम महाराज म्हणतात असे जर तू केलेस तर मग तुला काहीच कर्तव्य राहणार नाही,व तुझ्या हातातील संसार रुपी भूस सांडून फक्त नीज स्वरूप प्राप्त होईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

सेत आलें सुगी सांभाळावे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.