बैसोनि निश्चळ करीं – संत तुकाराम अभंग – 811

बैसोनि निश्चळ करीं – संत तुकाराम अभंग – 811


बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईल तो अन्न वस्त्रदाता ॥१॥
काय आम्हां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥
दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥२॥
न लगे सांगणें मागणें तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥३॥
तुका म्हणे लेई अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूंचि होसी ॥४॥

अर्थ

तू एका जागेवर बसून देवाचे चिंतन करत रहा निश्चिंत राहा तो ईश्वर तूला अन्न वस्त्र बसल्या जागेवर देईल.आम्हाला उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या गोष्टी अधिक साचवून काय करायचे आहे.सर्व काही पुरविणार तो देवच आमचा ऋणी झाला आहे त्यामुळे आम्हाला कसली कमतरता नाही.तो मोठा दयाळू आहे, मयाळू आहे,जो कोणी त्याला अनन्य भावाने शरण जातो त्याचे सर्व लाड तो पुरवितो.त्याला काही सांगावेही लागत नाही काही मागवेही लागत नाही कारण ज्याची मनात जशी इच्छा आहे त्याची ती इच्छा तो हरी पुरवितो.तुकाराम महाराज म्हणतात तू आपल्या अंगी विठ्ठल रुपी अलंकार परिधान कर म्हणजे तू देखील विठ्ठल मयच होऊन जाशील.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

बैसोनि निश्चळ करीं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.