वीर विठ्ठलाचे गाढे – संत तुकाराम अभंग – 807
वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पायां पडे ॥१॥
करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
क्षमा दया शांति । बाण अभंग हे हातीं ॥२॥
तुका म्हणें बळी । तेचि एक भू मंडळीं ॥३॥
अर्थ
विठ्ठलाचे सेवक हे वीर आहेत त्यामुळे कळी काळ त्यांच्या पाया पडतो.ते नेहमी विठ्ठल नामाचा घोष करतात त्यामुळे त्याचे दोषांचे डोंगर जाळून जातात.दया क्षमा शांती नामक अभंग म्हणजे न भंगणारे बाण त्या सेवकांच्या हाती कायम असतात.तुकाराम महाराज म्हणतात या संपूर्ण पृथ्वीवर तेच खरे बलाढ्य व बलवान आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
![]()
![]()
वीर विठ्ठलाचे गाढे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.
![]()
![]()