फजितखोरा मना किती – संत तुकाराम अभंग – 630

फजितखोरा मना किती – संत तुकाराम अभंग – 630


फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागे ॥१॥
स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥
निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखा ॥२॥
योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं याचि गुणें ॥३॥
तुका म्हणे मना पाहें विचारून । होई रे कठिण वज्राऐसें ॥४॥

अर्थ

हे माझ्या फजित खोर मना तुला किती सांगावे,कोणाच्याही मागे मागे जाऊ नकोस.आपण आपल्या देहा संबंधितांशी स्नेह धरला की आपल्याला दुःख होते अशा प्रकारचे प्रेमसुख हे फार कठोर असते.कोणी निंदा करो स्तुती करो किंवा दया माया करो,या सुखः दुःखा चि चाड मी धरणार नाही.योगी राज लोक जे आहे ते एकांतात आसनावर बसून राहतात,ते याच साठी.त्यांना इतर जनाशी सानिध्य नको असते.तुकाराम महाराज म्हणतात अरे मनात संसार संबंधितांची उपाधी किती कठीण आहे याविषयी स्वतःशीच विचार करून पहा आणि वज्रा सारखा कठीण तू व्हावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

फजितखोरा मना किती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.