जीव जायवरी सांडी – संत तुकाराम अभंग – 609

जीव जायवरी सांडी – संत तुकाराम अभंग – 609


जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥१॥
दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥
क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥२॥
तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फलकट वेंचि तें तें होय ॥३॥

अर्थ

देवा बालकाच्या आईने बालकाचा जीव जाईपर्यंत जर त्याचा त्याग केला तर ही मोठी आश्चर्‍याची गोष्ट आहे.हे नारायणा तुम्ही दुर्बळ झाला आहात की आमचे बोलणे तुमच्या कानापर्यंत येत नाही नेमके कमीपणा आहे तरी कोठे?अहो देवा मी क्षणाक्षणाला तुमची करून भाकत आहे तरीदेखील तुम्ही माझ्याकडे लक्षही देत नाहीत माझा सांभाळ तुम्ही करत नाही ठीक आहे हे माझे काही तरी अभाग्याचा काळ आहे त्यामुळे तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या बोलण्यात तुम्हाला काही रुची वाटत नाही त्यामुळे आमचे बोलणे फोलपटा सारखे निरस झाले आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जीव जायवरी सांडी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.