नका वांटूं मन – संत तुकाराम अभंग – 454

नका वांटूं मन – संत तुकाराम अभंग – 454


नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥१॥
खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघेचि जाये एका घांसें ॥ध्रु.॥
जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥२॥
तुका म्हणें येथें न मना विषाद । निंबेंविण व्याध तुटों नये ॥३॥

अर्थ

तुम्ही विधिनिषेधाची कटकट मुळीच करू नका पांडुरंगाचेच स्मरण मनात करत राहा.सगळे जेवण होत आले आहे,पण शेवटच्या घासत माशी पोटात गेली असे कोणी कोणाला म्हणू नये.कारण त्या कल्पनेनेच सगळे अन्न ओकून पडेल.एखादी लाभाची गोष्ट सहज घडते पण पुढे जपून ठेवणे फार कठीण आहे.म्हणून तिचे दक्ष पने रक्षण करावे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या बोलण्याचा आपण विषाद मानू नका.खरोखर कडूनिंबाच्या कट्याशिवाय शरीरातील व्याधी बरी होत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

नका वांटूं मन – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.