कलियुगीं कवित्व करिती – संत तुकाराम अभंग – 439

कलियुगीं कवित्व करिती – संत तुकाराम अभंग – 439


कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥१॥
द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडेंचि ॥ध्रु.॥
दंभ करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥२॥
वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥३॥
तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥४॥

अर्थ

अहो कलियुगामध्ये असे पाखंडी लोक झाले आहेत कि जे खूप चांगल्या प्रकारे कवित्वही करतात व भांडणही करतात. चित्तामध्ये द्रव्य, पत्नी, पुत्र, घरदार मान-सन्मान याची आवडतात धरतात आणि मुखाने केवळ वैराग्याच्या कोरड्या गप्पा हाणतात. लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा यासाठी साधूत्वाचे दांभिक सोंग हे पाखंडी लोक घेतात मुखाने वैराग्याच्या त्यागाच्या गोष्टी बोलतात परंतु मनामध्ये त्याचा लवलेशही नसतो. वेदाने ज्या आज्ञा दिल्या आहेत तसेच आपले स्वहित ज्यामध्ये आहे त्या गोष्टी करत नाहीत आणि देहावरून आलीप्त तर होतच नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात वाचेने जे बोलाल तसे जर केले नाही तर तो पुढे यमाचे दंड सहन करेल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


कलियुगीं कवित्व करिती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.