बुद्धिहीना उपदेश – संत तुकाराम अभंग – 1501

बुद्धिहीना उपदेश – संत तुकाराम अभंग – 1501

बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥१॥
हुंगों नये गोऱ्हावाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥
अळसियाचे अंतर कुडें । जैसें मढें निष्काम ॥२॥
तुका म्हणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥३॥

अर्थ

बुद्धिहीन मनुष्यांना उपदेश करणे म्हणजे अमृतामध्ये विष कालवल्यासारखेच आहे. शौचाच्या ठिकाणी जाऊन कधीच वास घेऊ नये त्याने दुर्गंधीच येते आणि विटाळ होतो. आळशी मनुष्याचे मन दुष्ट असते, जसे मढे काहीही करू शकत नाही त्याप्रमाणे आळशी मनुष्य हे निष्काम असतात त्यांना काहीही करण्याची इच्छा होतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे श्रीपती अशा बुद्धिहीन निष्काम लोकांच्या हातातुन मला वाचवा.

वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.