जरा कर्णमूळीं सांगों – संत तुकाराम अभंग – 1475

जरा कर्णमूळीं सांगों – संत तुकाराम अभंग – 1475


जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥१॥
आतां माझ्या मना होई सावधान । ॐपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥ध्रु.॥
शेवटील घडी बुडतां न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥२॥
तुका म्हणे चिंतीं कुळींची देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥३॥

अर्थ

अरे मना तुझ्यात कानाजवळ पांढरे केस मृत्यूची भेट जवळ आले आहे हेच उतारवयात तुला सांगत आहेत. आता हे मना तू सावध हो आणि ओमकार स्वरूप हरिचिंतन करून प्रत्येक दिवस पुण्याचा आहे असे समजून कार्‍याची सिद्धी होईपर्यंत हरीचे चिंतन कर. तुझ्या आयुष्यातील शेवटची घटका, बुडण्याची वेळ लागायचा नाही त्यामुळे सावध हो व याकरिता मृत्यू जवळ आला आहे असे समजूनच आयुष्याचा प्रत्येक क्षण हरिचिंतन करण्यात घाल. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या हरीचे, कुळदैवतेचे चिंतन कर व हरी वाचून सर्व मिथ्या आहे हे समजून प्रत्येक वेळी हरिचिंतन कर.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जरा कर्णमूळीं सांगों – संत तुकाराम अभंग – 1475

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.