ऐसा कोणी नाहीं हें – संत तुकाराम अभंग – 1472

ऐसा कोणी नाहीं हें – संत तुकाराम अभंग – 1472


ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥१॥
निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दुःखें व्याधि पीडा ॥ध्रु.॥
काय पळे सुखे चोर लागे पाठी । न घालावी काठी आड तया ॥२॥
जयाचें कारण तोचि जाणे करूं । नये कोणां वारूं आणिकासी ॥३॥
तुका म्हणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥४॥

अर्थ

जगामध्ये असे कोणीही नाही की ज्याला घर-दार, कन्या, पुत्र, घोडे वगैरे आवडत नाही. कडू लिंबाचा रस कोणी घेईल काय, परंतु दुःख, व्याधी, पीडा नष्ट होण्या करिता रोगी मनुष्य मोठ्या आवडीने कडुलिंबाचा रस घेतो. व्यर्थ कोणताही मनुष्य पळत सुटेल काय, परंतु त्याच्या मागे चोर लागले तर तो पडणारच व पळणाऱ्याला कोणीही आडकाठी घालू नये. ज्याचे काम त्यालाच योग्यप्रकारे जमते त्यामुळे ज्याचे त्याचे काम करताना त्याला कोणीही आडवे येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात निजठेवा तेव्हाच सापडतो जेव्हा आपण आपला जीव ओवाळून बळी देतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google PlayYouTube - Apps on Google Play

ऐसा कोणी नाहीं हें – संत तुकाराम अभंग – 1472

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.