पाहा किती आले शरण समानचि- संत तुकाराम अभंग –1436

पाहा किती आले शरण समानचि- संत तुकाराम अभंग –1436


पाहा किती आले शरण समानचि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥
मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥
नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग न म्हणे दगड ॥२॥
तुका म्हणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरी मना । केला तो उगाणा घडल्या महादोषांचा ॥३॥

अर्थ

देवा तुला आजपर्यंत कितीतरी भक्त शरण आलेले आहेत आणि तू त्यांना तुझ्या सारखेच केले आहे. व तसे करताना कोणाचाही गुणदोष तू पाहिले नाही. ज्या संतांना तू आश्रय दिला आहे त्यांच्या पेक्षाही खालचा आश्रय मला दे. मला संतांच्या पेक्षाही खालचे स्थान मिळाले तरी चालेल, मी संतांच्या थोरपणाचा हेवा करत नाही. ज्यावेळी तू भक्तांच्या संसाराचा भार नाहीसा करण्यासाठी धाव घेतो त्यावेळी तु त्यांचा आचार, कुळ, गोत्र यांचा विचार करत नाही. मी दगडासारखा आहे कि कसा आहे, हे तू पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू सर्व जाणता आहेस तुझ्या मनात आले तर तू सर्व घडलेल्या पतकाचे नाश करू शकतोस असे तुझे सामर्थ्य आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

पाहा किती आले शरण समानचि- संत तुकाराम अभंग –1436

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.