चालिले न वाटे- संत तुकाराम अभंग –1412

चालिले न वाटे- संत तुकाराम अभंग –1412


चालिले न वाटे । गाऊनियां जाता वाटे ॥१॥
बरवा वैष्णवांचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥ध्रु.॥
नाहीं भय आड । कांहीं विषमांचें जड ॥२॥
तुका म्हणे भक्ती । सुखरूप आदीं अंतीं ॥३॥

अर्थ

हरिनाम गात पंढरीच्या वाटेने चालले तर नाम सहवासाने चालण्याचा श्रम वाटत नाही. त्यातल्यात्यात वैष्णवांचा संग असेल तर अति उत्तम कारण वैष्णवांच्या संगतीत राहिल्याने श्रीरंग आपल्यासमोर आपोआप येतो. पंढरीच्या वाटेने चालत असताना हरिनाम व वैष्णवांची संगती असेल तर कसलेच भय आडवे येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरी नामाची भक्ती आधीपासून अंती पर्यंत सुखरूप आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

चालिले न वाटे- संत तुकाराम अभंग –1412

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.