धरूनियां सोई परतलें मन- संत तुकाराम अभंग –1410

धरूनियां सोई परतलें मनसंत तुकाराम अभंग –1410


धरूनियां सोई परतलें मन । अनुलक्षीं चरण करूनियां ॥१॥
येई पांडुरंगे नेई सांभाळूनि । करुणावचनीं आळवितों ॥ध्रु.॥
बुद्धि जाली साह्य परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥२॥
न चलती पाय गिळत जाली काया । म्हणऊनि दया येऊं द्यावी ॥३॥
दिशेच्या करितों वारियासीं मात । जोडुनियां हात वाट पाहें ॥४॥
तुका म्हणे वेग करावा सत्वर । पावावया तीर भवनदीचें ॥५॥

अर्थ

देवा माझे मन संसारापासून परतले आहे आणि माझ्या मनाने तुम्हाला शरण जाणे हाच एक मार्ग पत्करला आहे. त्यामुळे हे पांडुरंगा विठाबाई तू मला तुझ्या जवळच सांभाळून ने अशी करून वचने मी तुला आळवित आहे. देवा आता माझी बुद्धी परमार्था विषयी साह्य झाली आहे पण माझ्या शरीरामध्ये शक्ती राहिली नाही मी तुझी वाट पाहत आहे आणि तू मला दिसला नाही तर मला दुःख होते व माझ्या डोळ्यातून पाणी येते. देवा मला माझ्या पायाने चालत नाही माझे शरीर थकून गेले आहे त्यामुळे तुम्हाला माझी दया येऊ द्या, देवा ज्या दिशेने वारा येतो त्या दिशेने तोंड करून मी त्या वार्‍याला विचारतो अरे वाऱ्या माझा पांडुरंग माझ्या भेटीला केव्हा येणार आहे, आणि पुन्हा मी हात जोडून तुझी वाट पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मला भवन नदीच्या पहिल्या तीराला नेण्यासाठी त्वरा करा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

धरूनियां सोई परतलें मन- संत तुकाराम अभंग –1410

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.