जरी आलें राज्य मोळविक्या – संत तुकाराम अभंग –1402

जरी आलें राज्य मोळविक्या – संत तुकाराम अभंग –1402


जरी आलें राज्य मोळविक्या हाती । तरी तो मागुता व्यवसायी ॥१॥
तृष्णेचीं मंजुरें नेणती विसांवा । वाढें हांव हांवां काम कामीं ॥ध्रु.॥
वैभवाचीं सुखें नातळतां अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥२॥
तुका म्हणे वाहे मरणाचें भय । रक्षणउपाय करूनि असे ॥३॥

अर्थ

एखाद्या मोळी विक्या माणसाच्या हाती राज्य जरी आले तरी त्याला आपला पूर्वीचाच धंदा चांगला आहे असेच वाटते. त्याप्रमाणे संसारी मनुष्याला सुंदर नरदेह जरी मिळाला तरी तो त्या नरदेहाच्या तृष्णेचा मजूर होऊन बसतो. त्याला विश्रांती काय आहे हे माहीत नसते त्यामुळे त्याच्या हवेने हाव व कामाने काम वाढतच जाते घरी कितीही सुख असले तरी श्रीमंती असली तरीही तो त्याचा भोग घेत नाही. उलट मिळालेल्या भोगाला काही विघ्ने येतील की काय म्हणून तो नेहमी चिंता करतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याला नेहमीच मरणाचे भय वाटते व तो त्याच्यावर कायम उपायही करत असतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जरी आलें राज्य मोळविक्या – संत तुकाराम अभंग –1402

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.