मेलियांच्या रांडा इिच्छती – संत तुकाराम अभंग –1369

मेलियांच्या रांडा इिच्छती – संत तुकाराम अभंग –1369


मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥१॥
मागिलां पुढिलां एकी सरोवरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥
आन दिसे परी मरण चि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥२॥
तुका म्हणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥३॥

अर्थ

ज्यांचे नवरे मेले आहे त्या स्त्रिया लेकरू व्हावे अशी इच्छा करतात. त्यांना त्याविषयी मोह धरावा याची त्यांना लाज कशी वाटत नाही. पती जिवंत असताना केलेला व्यवहार, गेल्यानंतर केलेला व्यवहार जर सारखाचं होऊ लागला तर त्या स्त्रियांचे वागणे म्हणजे काळाच्या पेटीवर बसून काळाच्या खांद्यावर जाण्यासारखे कृत्य आहे. उंदीर जसा आपले घर समजून बिळात शिरतो, पण त्यात त्याचे त्यात खरे मरण असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळी विषयापासून मन परत येते त्याच वेळेस आत्मज्योति आपल्याला दिसून येते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

मेलियांच्या रांडा इिच्छती – संत तुकाराम अभंग –1369

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.