न लगे द्यावा जीव – संत तुकाराम अभंग –1234

न लगे द्यावा जीव – संत तुकाराम अभंग –1234


न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥१॥
मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥२॥
तुका म्हणे कई होईल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥३॥

अर्थ

मुद्दाम जीव देण्याची गरज नाही तो एक दिवस जाणारच आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. जो देवाजवळ मरण मागतो तो गाढवाचा बाळ आहे, एवढेच नाही तर तो शुद्ध चांडाळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात की जो देवाला मरण मागतो त्याला हे कसे कळत नाही की देहरूपी अमूल्य ठेवा जर तो राहिलाच नाही तर मेल्यानंतर काहीही आपले हित होणार नाही उलट जिवंत राहून संत सेवा घडेल हरिभक्ती होईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

न लगे द्यावा जीव – संत तुकाराम अभंग –1234

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.