हारपल्याची नका चित्तीं – संत तुकाराम अभंग –1231

हारपल्याची नका चित्तीं – संत तुकाराम अभंग –1231


हारपल्याची नका चित्तीं । धरूं खंती वांयांचं ॥१॥
पावलें तें म्हणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥
होणार तें तें भोगें घडे । लाभ जोडे संकल्पें ॥२॥
तुका म्हणे मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥३॥

अर्थ

एखादी वस्तू जर हरवली तर त्याविषयी खंत मानु नका. एखादी वस्तू जर हरवली तर देवाला अर्पण केले असे म्हणा त्यामुळे तुम्हाला देवाची सहजच सेवा घडते. जसे भाग्यात, नशिबात आहे ते घडतेच पण जर एखादी वस्तू हरवली आणि तुम्ही देवाला समर्पण केल्याचा संकल्प केला तर त्या योगाने तुम्हाला मोठा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळी आपले मन मोकळे असते त्या वेळी आपल्या कडून आपोआप पूण्य कर्म घडत असते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

हारपल्याची नका चित्तीं – संत तुकाराम अभंग –1231

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.