वर्णावी ते थोरी- संत तुकाराम अभंग – 1176

वर्णावी ते थोरी- संत तुकाराम अभंग – 1176


वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥१॥
उदंडचि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥
त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वर्णिताती ॥२॥
अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥३॥
तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्ममरण व्यथा दूर होती ॥४॥

अर्थ

जर तुम्हाला थोरवी करायची असेल तर विठ्ठलाची करा मानवाची कीर्ती कोणालाही सांगू नका .असे मनुष्य अनेक आहेत कि ते जन्माला आलेत आणि मेलेत‌ हि. पूर्वी असे अनेक राजे झाले आहेत की ते नंतर रंकही झालेत आणि अनेक रंक देखील राजे झालेले आहेत . अशा लोकांचे वर्णन मात्र चराचरात कोणीही करत नाही ,पण विठ्ठलाचे वर्णन चारही वेद, सहाही शास्त्रे करतात .नारायण अक्षय आहे व त्याची कीर्ती कळत नाही त्यामुळे नारायणाचे ध्यान सतत करत राहावे .तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर विठ्ठलाचे ध्यान सतत तुमच्या चित्तामध्ये करत राहाल तर तुमच्या जन्म आणि मरण याची व्यथा दूर होईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

वर्णावी ते थोरी- संत तुकाराम अभंग – 1176

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.