जेथें आठवती स्वामींचे – संत तुकाराम अभंग – 1103

जेथें आठवती स्वामींचे – संत तुकाराम अभंग – 1103


जेथें आठवती स्वामींचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥
रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त तें ते घडी ॥ध्रु.॥
धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प गोविंदाचे ॥२॥
तुका म्हणे लाभकाळ ते चि जीणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥३॥

अर्थ

जेथे हरीच्या पायाचे चिंतन चालू असते तेच ठिकाण उत्तम आणि रम्य असते .हरिचिंतन रानात वनात एकांतात केव्हाही चित्ताला समाधानच देते. ज्यावेळी गोविंदाचे चिंतन करण्याचा संकल्प आपण करतो तो काळ धन्य आहे व आनंद देणारा काळ आहे .तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य जीवनात ज्या ज्या वेळी हरीचे चिंतन करतो ,नारायणाचे चिंतन चित्तात करतो तो काळ लाभदायक आहे आणि यालाच उत्तम भाग्य देखील म्हणतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जेथें आठवती स्वामींचे – संत तुकाराम अभंग – 1103

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.