एकाचिये सोई कवित्वाचे – संत तुकाराम अभंग – 1089

एकाचिये सोई कवित्वाचे – संत तुकाराम अभंग – 1089


एकाचिये सोई कवित्वाचे बांधे । बांधिलिया साधे काय तेथें ॥१॥
काय हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुनि काय ॥ध्रु.॥
कवित्वाचे रूढी पायां पडे जग । सुखावोनि मग नरका जाय ॥२॥
तुका म्हणे देव केल्याविण साहे । फजिती ते आहे लटिक्या अंगीं ॥३॥

अर्थ

एखाद्या प्रासादिक कवीने शब्दांची जुळवाजुळव करून कविता तयार केली आणि त्याच्या शब्दाची चोरी करून दुसऱ्या एखाद्या कवीने दुसरे काव्य तयार केले तर त्या काव्यापासून त्याला काय लाभ होणार आहे? भुसाचे जर कांडण केले तर त्यापासून काय होणार आहे त्याप्रमाणे सत्याची पायमल्ली करून काय उपयोग होणार आहे? एखाद्या प्रसादिक कवीच्या कवितेतील शब्द चोरून त्याच शब्दा द्वारे नवीन काव्य तयार करून तो कवी व त्यांची कविता ही जगामध्ये मानसन्मानास पात्र होईल परंतु असे केल्याने तो कवी सुखासुखी नरकाला जाईल. तुकाराम महाराज म्हणतात देवाची प्राप्ती झाल्यावाचुन केलेले काव्य म्हणजे केवळ खोटे आहे आणि शेवटी त्याची फजिती तर होते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

एकाचिये सोई कवित्वाचे – संत तुकाराम अभंग – 1089

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.