राम म्हणतां कामक्रोधांचें – संत तुकाराम अभंग – 1079

राम म्हणतां कामक्रोधांचें – संत तुकाराम अभंग – 1079


राम म्हणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥
राम म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नासही ॥ध्रु.॥
राम म्हणतां जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधी ॥२॥
राम म्हणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥३॥
राम म्हणतां धर्म घडती सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥४॥
राम म्हणतां म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥५॥

अर्थ

राम नाम घेतले की काम ,क्रोधाचे दहन होते ते जळून जातात .आणि अभिमान तर देशोधडीला जातो राम म्हटले तर भव बंधन हे देखील तुटून जातात आणि कोणत्याही प्रकारचे स्वप्नातही श्रम येत नाही .रामाचे नामस्मरण जरी केले,स्मरण केले तर जन्म-मृत्यू टळतो म्हणजे गर्भवास पुन्हा पुन्हा होत नाही .आणि तो मनुष्य कधीही दारिद्र्यास पात्र होत नाही. रामाचे नाम घेतले की यम देखील दरिद्री होऊन आपल्याला शरण येतो .आणि त्यामुळे अमरपणा आपल्याला प्राप्त होतो ,ध्रुवाला‌ जे अढळपदाची आपल्याला प्राप्त झालेल्या अमरपणा पुढे काय माहिती आहे ?राम नाम घेतले की सर्व धर्म घडतात आणि डोळ्यावर जे अज्ञानाचे पडळ आलेल्या आहे ते क्षणात नाहीसे होतात. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की रामाचे नाम अंतकरणापासून घेतले की हा भवसिंधु सहजच मनुष्य तरुण जाईल त्याचा उद्धार होईल यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

राम म्हणतां कामक्रोधांचें – संत तुकाराम अभंग – 1079

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.