नाहीं सुगंधाची लागत – संत तुकाराम अभंग – 1023

नाहीं सुगंधाची लागत – संत तुकाराम अभंग – 1023


नाहीं सुगंधाची लागत लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥१॥
वाऱ्या हातीं माप चाले सज्जनाचें । कीर्ती मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥
प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥२॥
तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥३॥

अर्थ

सुगंध उत्पन्न करण्याकरता कोणत्याही प्रकारची पेरणी करावी लागत नाही तर जसे फुल असेल तसें सुगंध आपोआप तयार होतो अगदी त्याचप्रमाणे मन शुद्ध झाले की सद्गुण ही आपोआप तयार होते.सद्गुण व कीर्ती हे दोन्ही गुण चांगल्या मनुष्याचे जसे सुगंध वाऱ्यासारशी पसरते तसे त्यांचे सज्जन व्यक्तींचे हे सद्गुण आणि कीर्ती वाऱ्यासारशी पसरते व त्यांची व कीर्ती सांगणारे मुखही नारायणाचे चसते.सूर्य आणि प्रकाश हे दोन्ही वेगवेगळे आहेत काय तर नाही याला सर्व लोकही साक्षी आहेत तसेच सज्जन व्यक्ती तो जेथे जेथे जात असतो तेथे त्याची कीर्ती व सद्गुण हे आपोआपच प्रसारित होतात.तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्हाला सायास करायचेच असेल तर सत्यासाठी सायस करा कारण ज्याप्रमाणे नमिताचा नाश होत नाही त्याचप्रमाणे तर त्याचाही कधीच नाश होत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

नाहीं सुगंधाची लागत – संत तुकाराम अभंग – 1023

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.