काय वाणूं आतां न पुरे – संत तुकाराम अभंग – 1014

काय वाणूं आतां न पुरे – संत तुकाराम अभंग – 1014


काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥
भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥३॥
तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें स्रवतसे ॥४॥

अर्थ

आता मी या संतांचे वर्णन तरी कसे करू कारण ऐवढे सामर्थ्य एवढे बळ माझ्या वाणीत नाही मी बाकी काहीही न करता या संतांच्या चरणावर मस्तक ठेवतो.परिस आपले मोठेपणा आपली थोरी बाजूला ठेवून तोच लोखंडाचे सोने करतो तो असे म्हणत नाही की मी परिस आहे आणि हे लोखंड आहे मी याला कसा स्पर्श करू.संत ही तसेच आहे ते या जगाच्या कल्याणा करता अवतार घेतात आणि या भूतालातील लोकांवर परोपकार करण्याकरता देह कष्टविता.संतांचे भांडवल म्हणजे तरी काय तर ते या भूतांवर म्हणजे प्राणी मात्रांवर दया करतात व स्वतःच्या देहाविषयी त्यांना मुळीच ममत्व नसते.तुकाराम महाराज म्हणतात हे संत दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात आणि त्यांच्या वाणीतून नेहमी नामामृत स्त्रवत असते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

काय वाणूं आतां न पुरे – संत तुकाराम अभंग – 1014

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.