पांचांची वाट पांचांसवे गेली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६७८

पांचांची वाट पांचांसवे गेली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६७८


पांचांची वाट पांचांसवे गेली ।
येरासि जाहली देशधडी ॥१॥
अकरावें होतें धरुनियां नेलें ।
बारा तेरा गिळिलें धन माझें ॥२॥
रखुमादेविवरु चोळु पैं घोटिला ।
निधन जाहाला शुध्दपणें ॥३॥

अर्थ:-
पंचमहाभूताचे बनलेले शरीर पंचत्वाला गेल्यावर बाकीच्यांची म्हणजे अन्य विकारांची देशोधडी झाली. दहा इंद्रियांचे चालक जे अकारावे मन होते ते धरुन नेले. बारावे चित्त आणि तेरावी बुद्धि हेच माझे मुख्य धन होते. तेच सर्व गिळून टाकले. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांनी माझ्या जीवीचा घोट घेतला. त्यामुळे ह्या जीवाचे बुद्ध्यादिकासंह वर्तमान सर्व अविद्यक ऐश्वर्य नाहीसे होऊन शुद्ध परमात्मरुप झालो. असे माऊली सांगतात.


पांचांची वाट पांचांसवे गेली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६७८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.