सज्ञानीं पाहातां अज्ञान तत्त्वतां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५५९

सज्ञानीं पाहातां अज्ञान तत्त्वतां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५५९


सज्ञानीं पाहातां अज्ञान तत्त्वतां ।
अज्ञानीं अमृता सदगुरु जाणे ॥१॥
गुरुगम्य सत्ता शिष्य होय सरता ।
पूर्णी पूर्ण हातां ब्रह्म येत ॥२॥
आदि मध्य घर हरीचा शेजार ।
हरिविण थार नाहीं कोठें ॥३॥
ज्ञानदेवीं चित्त गुरु धर्म वित्त ।
अवघें जीवित हरि केला ॥४॥

अर्थ:-

ज्ञानी पुरूषाला इतर लोक अज्ञानी दिसतात पण तेच लोक जर सदगुरुला शरण गेले तर ते परमात्म्याला जाणून ब्रह्मस्वरुप जाणतात. श्रीगुरूच्या ठिकाणी असणाया अगम्य सत्तेला जो शिष्य शरण जाऊन सरता होईल. त्याला परिपूर्ण असलेले ब्रह्मस्वरुप त्याच्या हाती लागेल. आणि त्यामुळे ज्याला उत्पत्ति स्थिती, नाश नाही अशा श्रीहरिचा शेजार त्याला मिळून हरि व्यतिरिक्त कांही नाही. असा त्याचा निश्चय होतो. श्री गुरुंमुळे माझे चित्त, वित्त, धर्म इत्यादी सर्व हरिरूपच झाले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


सज्ञानीं पाहातां अज्ञान तत्त्वतां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५५९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.