संसारकथा प्रपंच चळथा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५५२

संसारकथा प्रपंच चळथा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५५२


संसारकथा प्रपंच चळथा ।
मनाचा उलथा विरुळा जाणे ॥१॥
होतें तें पाहीं नव्हे तें घेई ।
द्वैतबुध्दि ठायीं गुंफ़ों नको ॥२॥
चित्तवृत्ति ध्यानीं मनाची निशाणी ।
भ्रमभेद कानीं ऐकों नको ॥३॥
ज्ञानदेव गंगा नि:संगाच्या संगा ।
वेगीं श्रीरंगा शरण जाई ॥४॥

अर्थ:-

संसाराच्या गोष्टी म्हणजे केवळ बाष्कळ गोष्टी आहेत. आत्मस्वरूपाचा विचार करणारा जगांत फार विरळा आहे. जे होते ते पहा आणि या अनात्म द्वैतबुद्धीत गुंतु नको. चित्ताला परमात्मस्वरूपाचे नित्य ध्यान करीत जा. भेदभ्रमाची गोष्ट कानांनी ऐकू सुद्धा नको.ज्ञानेश्वर महाराज सांगतात. माझी बुद्धीरूपी गंगा संग रहित परमात्म्याच्या संगतिला लावली आहे. तसे तुही कर म्हणजे तू अविनाशी भेदरहित स्वरूपच होशील.


संसारकथा प्रपंच चळथा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५५२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.