सकळ धर्मांचे कारण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३७

सकळ धर्मांचे कारण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३७


सकळ धर्मांचे कारण ।
नामस्मरण हरिकीर्तन ।
दया क्षमा समाधान ।
संतजन साधिती ॥१॥
निजधर्म हा चोखडा ।
नाम उच्चरु घडघडा ।
भुक्तिमुक्तीचा संवंगडा ।
हा भवसिंधुतारक ॥२॥
लावण्यमान्यताविद्यावंत ।
सखे स्वजन पुत्रकलत्र ।
विषयें भोग वयसा व्यर्थ ।
देहासहित मरणावर्ती ॥३॥
जें जें देखणें सकळ ।
तें स्वप्नीचें मृगजळ ॥
म्हणौनि चिंती चरणकमळ ।
रखुमादेविवरा विठ्ठलाचे ॥४॥

अर्थ:-

धर्माच्या सर्व कारणांच्या पुर्ततेसाठी हरिकीर्तन दया क्षमा व समाधान आवश्यक असते व तेच संतजन साधत असतात. भवसिंधु तारक, भुक्ती व मुक्तीचा संवगडी असलेला निजधर्म हा घडघडा नाम उच्चारामुळे साध्य होतो. विद्वानातील अहंकार, शरिर सौंदर्य, सखे, स्वजन, मुले पत्नी हे विषयभोगची प्रतिके आहेत.व ते देहासहित मरणाच्या भोवऱ्यात टाकणारे आहे. जे जे जड सुंदर दिसते ते एक मृगजळासारखे भासमान आहे म्हणुन माझे पिता व रखुमाईचे पती यांचे चरणकमळांचे चिंतन कर असे माऊली सांगतात.


सकळ धर्मांचे कारण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.