अशौचीया जपो नये आणिकातें ऐको नये – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४२६

अशौचीया जपो नये आणिकातें ऐको नये – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४२६


अशौचीया जपो नये आणिकातें ऐको नये ।
ऐसिया मंत्राते जग बिहे त्याचें
फ़ळ थोडें परि क्षोभणें बहु ।
ऐसा मंत्रराज नव्हेरे रे ॥१॥
नारायण नाम नारायण नाम ।
नारायण नाम म्हणकारे रे ॥२॥
बाह्य उभारावी त्या वरी काहाळ लावावी ।
गातिया ऐकतिया उणीव येवों नेदावी ।
उत्तमापासुनि अंत्यजवरी ।
मुक्तीची सेल मागावीरेरे ॥३॥
काय कराल यागें न सिणावें
योगें हें तों व्यसनचि वाउगें ।
नरहरि नरहरि उदंडा वाचा
म्हणाल तरि कळिकाळ राहेल उगेरेरे ॥४॥
चरणीं गंगा जन्मली अहिल्या उध्दरली
नामें प्रतिष्ठा पावली गिरिजा ।
सकळिकां साधना वरिष्ठ हें नाम
मा मनीं भाव न धरी दुजारेरे ॥५॥
तीर्थी भजिजाल अमरीं पूजींजाल तुमचिया
भावासारिखा देवो होईल ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु तुमचा
ऋणवई म्हणतां नलजेरेरे ॥६॥

अर्थ:-

अशौचिया हा शब्द जपणाऱ्याचे विशेषण नाही. व ते वेद मंत्रांचे ही नाही व त्यांचे विशेषणही नाही. जे जारणमारणादी मंत्र जे स्वार्थासाठी वापरले जातात ते मंत्र अशौच मंत्र म्हंटले गेले आहेत असे मंत्र लोकांनी सांगितले तरी ऐकु नयेत त्या मंत्रांना जग भिते. त्यांचे फळ थोडे व त्या मंत्रांचा क्षोभ जपणाऱ्याला जास्त होतो. पण नाममंत्र हा तसा जप नाही. असे नारायण नाम तु सतत जप. बाह्या उंच करुन हे भजन करावे. त्या भजनात ऐकाणाऱ्याने व गाणाऱ्याने उणिव येऊ देऊ नये. उत्तम ज्ञानी ते अंत्यज ह्यांनी ही मुक्तीची मागणी करावी.त्या योग व यागामुळे वायाच थकशील ते वाऊगे व्यसन ठरते. नरहरिनाम जपलेस तर तो कळिकाळ गप्प उभा राहिल. त्या नामाच्या पायी गंगा जन्मली अहिल्येचा उध्दार झाला. त्यामुळेच गिरिजेला प्रतिष्ठा लाभली. त्यामुळे हा नाममंत्र साधना हे सर्वात वरिष्ठ आहे त्याच्या शिवाय अन्य कोणता भाव मनात धरु नकोस. माझे पिता व रखुमाईचा पती यांचे नाम जपले तर तीर्थे तुमचा आदर करतिल व ते स्वतः तुमचे ऋण व्यक्त करत तुमचे सेवाऋणी होतील तुझ्या कोणत्याही कामासाठी नाही म्हणणार नाहीत असे माऊली सांगतात.


अशौचीया जपो नये आणिकातें ऐको नये – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४२६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.