व्योमाचा पालऊ शिरेंविण पांगुरलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३५७

व्योमाचा पालऊ शिरेंविण पांगुरलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३५७


व्योमाचा पालऊ शिरेंविण पांगुरलें ।
मस्तकेंविण तुरंबिलें सुमन वो ॥१॥
सुखांचें सुख निजसुख नव्हें ।
नव्हें तें हो म्यां गिळिलेंगे माये ॥२॥
नेणेनि शाहाणे झाले चौघेजण ।
अठारांसी खूण बाणले माये ॥३॥
रखुमादेविवरु जीवनीं जीवनु ।
त्याहुनि माझें मनु परतें देवा ॥४॥

अर्थ:-

आपल्याला ब्रह्मानुभव आला तो प्रकार असा झाला की डोक्यावांचून आकाशाचा पदर पांघरला. घ्राणावांचून फुलांचा वास घेतला. ज्या सुखाच्या ठिकाणी सुख म्हणणेपणाही नाही. असे सुख मी गिळून टाकले. त्या परमात्म तत्त्वाला चारी वेदांनी विषय करून न जाणता वेद शहाणे झाले याची खुण अठरा पुराणांना उत्तम समजली आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल सर्व जीवांचे जीवन असलेला तो सोपाधिक असल्यामुळे त्याचे जे निरूपाधिक स्वरूप त्याठिकाणी माझे मन स्थिर झाले. असे माऊली सांगतात.


व्योमाचा पालऊ शिरेंविण पांगुरलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३५७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.