अवेवीं सावेव सम साम्य बुध्दी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २४४

अवेवीं सावेव सम साम्य बुध्दी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २४४


अवेवीं सावेव सम साम्य बुध्दी ।
शांति दया सिध्दि प्रगटल्या ॥१॥
वोळली हे कृपा निवृत्ति दयाळा ।
सर्व रोम पाल्हाळा प्रेमांकुर ॥२॥
दिवसाचें चांदिणें रात्रीचें उष्ण ।
सागितला प्रश्न निवृत्तिराजें ॥३॥
सोहंसिध्दमंत्रें प्रोक्षिलासंसार ॥
मरणाचि येरझार कुंठीयेली ॥४॥
चित्तवित्तगोत आपण पैं जाला ।
देहीं देहभाव गेला माझा ॥५॥
ज्ञानदेवा रसिं स्त्रान दान गंगे ।
प्रपंचेसी भंगे विषयजात ॥६॥

अर्थ:-

अवयवासी व्याप्त होऊन सावयव दिसणारा परमात्मा बुद्धीत साम्यरूपाने प्रगट झाल्यामुळे शांति,दया, अष्टसिद्धी माझ्या ठिकाणी आपोआप प्रगट झाल्या सर्वांग रोमांचित झाले. आणि किंचित् धर्मबिंदही आले. हे सर्व निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने झाले. दिवसाचे चांदणे व रात्रीचे ऊन या चमत्कारिक पद्धतीने निवृत्तीरायांनी मला प्रश्न प्रतिवचन रूपाने उपदेश केला. सोहं सिद्धी मंत्राने संसार शुद्ध केला. त्यामुळे माझी जन्ममरणाची येरझार खुटींत झाली. काय चमत्कार सांगावा माझे चित्त वित्त गोत निवत्तीराय आपणच झाला त्यामुळे देहाच्या ठिकाणचा देहभावही नाहीसा झाला. ब्रह्मरसाच्या गंगेत स्नान दान घडल्यामुळे माझा सर्व प्रपंच विषयासह वर्तमान पर होऊन गेला.असे माऊली सांगतात.


अवेवीं सावेव सम साम्य बुध्दी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २४४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.